Home महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या बळकटीकरणासाठी लढा

शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या बळकटीकरणासाठी लढा

10
0

राहुरी – शिव पाणंद शेतरस्ता कृती समिती राहूरी यांच्या वतीने या चर्चासत्राचे आयोयजन केले. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडून न्याय मिळवण्या सोबत शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या बळकटीकरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शासकीय विश्रामगृह, राहुरी, येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या समस्या यासह शेतकरी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, शेतीपुरक व्यवसाय व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे, तसेच शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या वाटेची आवश्यकता असते.

शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव, शेत व पानंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करावी. या बाबत सूचना देखील केल्या आहेत. परंतु तहसील कार्यालयांसह संबंधित विभागांकडून शेतकऱ्यांची होणारी अवहेलना थांबवण्यासाठी राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आला. अनेक शेतजमिनी शेतरस्त्या अभावी पडीक पडत चालल्या असुन अनेक फौजदारी स्वरूपांच्या घटनाही समोर येत असुन रस्त्या अभावी शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने शेतजमीनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
अर्ज बनवण्यापासून ते कोर्टाच्या अंतीम निकाला पर्यंतचा शेतकऱ्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी शिव पाणंद शेतरस्ता कृती समिती राहूरी यांच्या वतीने या चर्चासत्राचे आयोयजन केले. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडून न्याय मिळवण्या सोबत शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या बळकटीकरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शासकीय विश्रामगृह, राहुरी, येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट-
शिव, पानंद शेत रस्त्यांची मोजणी व हद्द निश्चित नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये शेतरस्त्यांमुळे निर्माण होणारे वाद वाढत चालले असून ११ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयाच्या अंमलबजानीसाठी प्रशासकीय न्यायालयीन जनआंदोलन, जनजागृतीद्वारे शेतकऱ्यांच्या संघर्षला पुर्णविराम देण्याच काम महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातुन करत राहणार- शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here