
गणराज्य न्यूज ब्राम्हणी : गावातील कायदा व सुव्यवस्था,अवैध व्यवसाय,वाढती भाईगिरी या विरोधात ब्राम्हणी गावातील संतप्त तरुण व ग्रामस्थ एकवटल्याचे सोमवारी दिसून आले.
रविवारी रात्री ब्राम्हणी बस स्टॅन्ड परिसरात तरुणांच्या दोन गटात वाद झाला.दरम्यान एका गटाने शस्त्र दाखवून धमकाविल्याचा आरोप करत संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.सदर घटनेची माहिती समजताच सकाळीच शेकडो तरुण ग्रामस्थ ब्राम्हणी जुने बाजारतळ येथे एकत्र आले.अनेकांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत अवैध व्यवसाय व पोलिस प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलिसांचे अवैध व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष असून पोलिस कर्मचारी व अवैध व्यावसायिक एकाच गाडीवर फिरत असल्याचा जाहीर आरोप गावऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर केला.यापूर्वी देखील अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील सात ते आठ तरुणांना दमबाजी करून मारण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस संबंधितांची हिम्मत वाढत असून गावात अशांतता आहे. पोलिसांनी वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर, अवैध व्यवसायिकांची हिंमत वाढली नसती याला जबाबदार वांबोरी बीट पोलिस कर्मचारीच असल्याचे आरोप तरुण ग्रामस्थांनी केला.
सकाळी 10 वाजता गावकरी एकत्र आले.जो पर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी येत नाही तो पर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित पोलीस कर्मचारी गावात नेमकी काय काय करतो. कोणासोबत फिरतो. अन् बसतो.हे लोकांनी त्या कर्मचाऱ्याच्या समोरच सांगितले.सदर कर्मचाऱ्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक झालेल्या जनतेच्या रोषापुढे जमले नाही.सदर पोलिस कर्मचाऱ्याची बोलती बंद झाली.दरम्यान वांबोरी बीटचे दोन कर्मचारी घटनास्थळी आले.लोकांनी त्यांच्याशी संवाद टाळत वरिष्ठांनाच बोलाविण्याची मागणी लावून धरली.तोपर्यंत बाजारतळावर ठिय्या मांडला.
अखेर पीआय संजय ठेगे ब्राम्हणीत दाखल झाले.यावेळी सुरेश बानकर, रंगनाथ मोकाटे, विजय बानकर,माणिक तारडे ,महेंद्र तांबे,प्रसाद बानकर,शेखर मोकाटे, शांताराम हापसे,संजय मोकाटे,विश्वनाथ हापसे, माऊली राजदेव,महेश हापसे, भानूआप्पा मोकाटे,सुभाष गोरे,उमाकांत हापसे, बाबासाहेब गायकवाड, कृष्णा राजदेव,गणेश तारडे,राजाबाबू हापसे, डॉ.काकासाहेब राजदेव,राम राजदेव,योगेश गोरे,राजेंद्र जाधव,गौरव हापसे,अजित मोकाटे,महेद्र हापसे,महेश मोकाटे, सिराज इनामदार आदींनी चर्चेत भाग घेत मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
ब्राम्हणी गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत कोण? याची जाहीर पोलखोल ग्रामस्थांनी केली. ब्राह्मणी गावातील अवैध व्यवसाया विरोधात याच क्षणापासूनच स्वतः लक्ष घालून संबंधितांना हद्दपार व तडीपार करणार असल्याची ग्वाही देत रात्रीच्या वादातील दोषींवर कारवाई करण्याचा इशारा पीआय संजय ठेंगे यांनी ग्रामस्थांसमोर दिला.
याशिवाय माध्यमिक शाळेसमोर टारगट तरुण मुलींना त्रास देत असल्याचे पालकांनी सांगितले. गावातील चर्चेनंतर पोलीस प्रशासन व पालकांनी शाळेत जावून शाळा प्रशासनाशी संवाद साधला. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या. शाळेच्या बाहेर मुलींच्या सायकली पार्किंग न करता त्या शाळेतच लावण्याच्या सूचना मुख्याध्यापक जाधव यांना केल्या.
यापुढे कोणत्या क्षणी पोलिसांची गाडी शाळा परिसरात फिरताना दिसेल. शाळेशी संबंध नसलेला व्यक्ती आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.असा इशारा पीआय ठेगें यांनी दिला. यावेळी पीएसआय गणेश वाघमारे, पोलीस कर्मचारी सुनील निकम,ज्ञानेश्वर ठोंबरे आदी उपस्थित होते

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0060,0.0000;
brp_del_sen:0.1000,0.1000;
motionR: 0;
delta:1;
bokeh:1;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 262.45502;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 38;
.












