Home राजकीय सरपंचताईंनी बांधल्या कर्मचाऱ्यांना राख्या

सरपंचताईंनी बांधल्या कर्मचाऱ्यांना राख्या

139
0
ब्राह्मणी – ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना राखीबांधून लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई बानकर यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
     ग्रामपंचायतच्या माध्यमातून कायम नागरिकांचे विविध प्रश्न व कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून आदर्श उपक्रम राबविण्यात आला. राखी बांधून कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सरपंच सुवर्णाताई सुरेशराव बानकर,ग्रामपंचायत सदस्या प्रियंकाताई अर्जुन आंबेडकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. यावेळी कर्मचारी पोपटराव हापसे, पोपटराव देशमुख, श्रावण वैरागर, शशिकांत देशमुख, सोपान वैरागर, दशरथ वैरागर, सुमन साठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here