
राहुरी : देव आपल्याला निर्भय करतात.त्यासाठी मंदिरे काळाची गरज आहे.अस प्रतिपादन हभप जगन्नाथ महाराज पाटील यांनी व्यक्त केले.
राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे श्री हनुमानक मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व जिर्णोद्धार सोहळ्या प्रसंगी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवसाची किर्तन सेवा हभप जगन्नाथ महाराज पाटील यांची होती.
कीर्तनात बोलताना हभप पाटील महाराज म्हणाले की,देव जेव्हा अंगणात येतो तेव्हा दैविक सुख मिळतं आणि देव जेव्हा अनुभूती देतो तेव्हा अध्यात्मिक सुख मिळत .. देव अंगणात आला की दारिद्र्य जातं देव अंतरात आला की दुर्गुण जातात आणि देव अनुभूतीत आला की दुर्दैव जातं. वृत्ती भगवी झाली तर कपडे भगवे करण्याची गरज नाही.











